कडेगांव (जि. सांगली) : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या पालकांपासून दूर राहून निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रक्षाबंधन हा पवित्र सण असून त्यामध्ये भाऊ बहिणीच्या प्रेमाचे अतूट नाते तयार होते. आपल्या बहिणीपासून दूर असणाऱ्या मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेविकांनी राखी बांधून त्याची उणिव भरून काढली यावेळी जवळपास ९० विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मुलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी शीला मोहिते आणि महेश माळी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले व मनोगत व्यक्त केले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्रा. अशोक माळी, प्रा. अविनाश यादव, प्रा. मंदा घाडगे, प्रा. ए. आर. वेताळ आदी मान्यवर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका उपस्थित होते.